
‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. तरी देखील ती मनूला घेऊन शाळेत सोडून येते. शाळा सुटल्यानंतर देखील अरुंधती तेथे पोहोचत नाही. त्यामुळे मनूला कोणी तरी घेऊन जाते.