
‘आई कुठे काय करते’ मालिकेत आरोहीची एण्ट्री झाल्यापासून अनेक वेगवेगळी वळणे येताना दिसत आहेत. यश हा आरोहीच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे अनिश आणि आरोहीची चांगली मैत्री पाहून ईशाला त्रास होतो. अनेक अडचणी आणि अडथळे येत असताना देखील आता दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर आरोहीने यशशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.






