
दुसरीकडे अनिरुद्धला ईशाची आठवण येते. सकाळी सकाळी शेजारच्या घरात जोरात गाणी सुरु असतात. ती ऐकून घरात ईशानेच गाणी लावली असे अनिरुद्धला वाटतो. तो पूर्ण पणे विसरतो की ईशा लग्न करुन गेली आहे. त्याला सर्वजण समजावण्याचा प्रयत्न करतात की ईशाला परत घेऊन ये मात्र तो ऐकायला तयार नाही. दरम्यान, अप्पा ईशाला आशिर्वाद देण्यासाठी तिच्या घरी जातात. ते देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांना देखील सोबत चलण्याचा सल्ला देतात. आता ईशा आणि अनिष इंदौरला जाणार का? अनिष आई-वडीलांशी संवाद साधणार का? आशुतोष आणि अरुंधती त्या दोघांचे पुन्ह लग्न लावणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.







