
दुसरीकडे ईशा आणि अनिश यांच्यामधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. सतत त्यांची अनबन सुरुच आहे. ईशा चहा ठेवण्यासाठी दूध गॅसवर ठेवून निघून जाते. बराच वेळ न पाहिल्यामुळे दूध जळते आणि संपूर्ण घरात धूर होतो. अनिश चिडतो आणि ईशाला सुनावतो. त्यावर ईशाने दिलेली उत्तरे अनिशला आणखी चिड येते. त्या दोघांमध्ये भांडण सुरु होते.








