Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेश'या' राज्यात आहे शुद्ध सोन्याने भरलेली रहस्यमयी गुहा! भारत एका दिवासात श्रीमंत...

‘या’ राज्यात आहे शुद्ध सोन्याने भरलेली रहस्यमयी गुहा! भारत एका दिवासात श्रीमंत होईल इतकं सोनं; पण या गुहेचे द्वार…

‘या’ राज्यात आहे शुद्ध सोन्याने भरलेली रहस्यमयी गुहा! भारत एका दिवासात श्रीमंत होईल इतकं सोनं; पण या गुहेचे द्वार…

[ad_1]

Sonbhandar Caves in Bihar : भारताला सोने की चिडियाँ असं म्हंटल जायचं… भारताकडे अफाट संपत्ती होती. मुघल आणि इंग्रजांनी मिळून  मोठ्या प्रमाणात भारताला लुटले. तरीही भारत अजूनही सोन्याचे छुपे भांडर आहेत. यापैकीच एक आहे भारतातील एक रहस्यमयी गुहा. या गुहेत शुद्ध सोन्याचा खजिना आहे. या गुहेचे द्वार उघडले तर संपूर्ण भारत एका दिवसात श्रीमंत होईल. इंग्रजानी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा खजिना काही सापडला नाही. जाणून घेऊया ही गुहा कुठे आहे. 

बिहारमधील राजगीर येथे ही गुहा आहे. सोन भंडार नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गुहेत हजारो वर्षे जुने सोने लपलेले असल्याचा दावा केला जातो. हा खजिना मगध सम्राट बिंबिसाराचा होता, जो इंग्रजांनाही सापडला नाही असेही सांगितले जाते.
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात राजगीर नावाचे एक ठिकाण आहे जिथे सोन भंडार गुहा आहे. त्यात हजारो टन सोने लपलेले असल्याचे म्हटले जाते. मात्र, अद्याप ही गुहा कुणाच्याच हाती लागलेली नाही. 

हा खजिना मगध सम्राट बिंबिसाराचा आहे. त्याने त्याच्या पत्नीच्या सल्ल्यानुसार ते गुहेत लपवून ठेवले होते. जेणेकरून ते सुरक्षित राहील असा इतिहासकारांचा तर्क आहे.  बिंबिसाराला सोने आणि दागिन्यांची खूप आवड होती. जेव्हा त्याचा मुलगा अजातशत्रूने त्याला पकडले तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व खजिना या गुहेत लपवून ठेवला. गुहेच्या आत एक लहान खोली आहे, ज्यामध्ये सैनिक राहत होते. याच्या मागे गुप्त खोलीत खजिना लपवलेला आहे. या खोलीचे द्वार  एका जड दगडाने बंद आहे. त्या दगडावर शंख लिपीत काहीतरी लिहिलेले आहे. असे मानले जाते की जो ते वाचू शकतो तोच खजिन्यापर्यंत पोहोचू शकतो. पण आतापर्यंत कोणीही दगडावरील मजकूर वाचण्यात यशस्वी झालेले नाही. ब्रिटिशांनी तोफांनी गुहा उडवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आजही गुहेवर कवचाच्या खुणा आहेत. 

सोन भंडारशी संबंधित कथा केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही. वायु पुराणातही याचा उल्लेख आढळतो.  जरासंधानेही येथे खजिना लपवला होता.
जरासंधाच्या वधानंतर, त्याचा खजिना देखील गुहेच्या गूढतेत लपला. तेव्हापासून आजपर्यंत कोणीही या खजिन्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही असे वायू पुराणात म्हंटले आहे. राजगीरला येणारे लोक या रहस्यमय गुहेला नक्कीच भेट देतात. हे ठिकाण म्हणजे रहस्मयी इतिहासाचे साक्षीदार आहे. तसेच हे ठिकाण पाहताना गुहेतील सोनं मिळवण्याची इच्छा निर्माण होते. 

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments