Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशभारतातील या शहरात आहे 'मृत्यूचं हॉटेल', लोक फक्त मरायला येतात अन् एका...

भारतातील या शहरात आहे ‘मृत्यूचं हॉटेल’, लोक फक्त मरायला येतात अन् एका दिवसासाठी देतात एवढं भाडे

भारतातील या शहरात आहे ‘मृत्यूचं हॉटेल’, लोक फक्त मरायला येतात अन् एका दिवसासाठी देतात एवढं भाडे

[ad_1]

भारत हा पर्यटन स्थळांनी नटलेला देश असून इथे पर्यटकांसाठी राहण्यासाठी असंख्य हॉटेल्स आहेत. वेगळ्या वेगळ्या बजेटमध्ये सुंदर आणि आकर्षित अशी हॉटेल्स आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्काच बसेल. भारतातील शहरात असं हॉटेल आहे, ज्याला मृत्यूचं हॉटेल म्हणतात. कुठे आहे हे हॉटेल आणि काय आहे यामागील इतिहास पाहूयात.

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. धर्माशी संबंधित लोकांमध्ये या स्थानांना खूप महत्त्व आहे. वाराणसी हे त्यापैकीच एक. बनारसच्या काठी लोक मोक्षासाठी येतात. तुम्हाला इथे अशी अनेक स्मशानभूमी दिसतील जिथे आग कधीच थंड होत नाही. हिंदू धर्मानुसार, जो बनारसमध्ये मरतो तो थेट वैकुंठाला जातो.

अनेक लोक त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची शेवटची इच्छा म्हणून बनारसमध्ये अंत्यविधीची व्हावेत असं म्हणतात. बनारसच्या पवित्र भूमीवर शेवटचा श्वास घेऊन येथेच प्राण त्याग करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अनेकजण निघून जातात. अशा स्थितीत त्यांची अस्थिकलश गंगेत टाकली जाते. मात्र, आता बनारसमध्ये अशी अनेक हॉटेल्स उघडली गेली आहेत, जिथे लोक राहतात आणि मृत्यूची वाट पाहतात.

होय, हे अगदी खरे आहे. सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तीने लोकांना या मृत्यूच्या हॉटेल्सची झलक दाखवली. खूप आजारी असलेले लोक या हॉटेल्समध्ये येतात. त्यांच्याकडे आता फारसा वेळ नसल्याची जाणीव होते. अशा परिस्थितीत बनारसमध्ये अखेरचे श्वास मोजण्यासाठी ते या मृत्यूच्या हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. ते इथेच खोल्या घेतात आणि तिथेच राहायला लागतात, जेणेकरून ते या ठिकाणी मरतात आणि थेट स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकतात.

एका हॉटेलच्या मालकाशीही त्या व्यक्तीने चर्चा केली. बनारसमध्ये मृत्यूची वाट पाहण्यासाठी आजारी लोक त्यांच्या हॉटेलमध्ये खोल्या घेतात, असे त्यांनी सांगितलं. येथे येणारे बहुतांश लोक हे रुग्ण आहेत, ज्यांना डॉक्टरांनीही उत्तरे दिली आहेत. हे लोक दिवसाला फक्त वीस रुपयांत हॉटेलमध्ये राहू शकतात. अनेक लोक दोन महिने मरणाच्या प्रतीक्षेत येथे राहतात. गेल्या काही काळापासून परिसरातील या हॉटेल्समध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशी अनोखी हॉटेल्स देखील अस्तित्वात आहेत हे जाणून लोकांना आश्चर्य वाटतं.

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments