
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्षू शर्मा (वय २१, रा. दिल्ली), आदित्य कणसे (वय २१) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृत विद्यार्थ्यांची नावे आहे. तर बिहारमधील कृष्णा इशू सिंग (वय २१) हा वाहन चालवत होता. तो या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. तर राजस्थानमधील चेष्टा बिश्नोई (वय २१) हा विद्यार्थी देखील या अपघातात जखमी झाला आहे. तर आणखी एका जखमीचे नाव समजू शकले नाही. ही घटना बारामती-भिगवण रोडवर जैनिकवाडी गावाजवळ पहाटे ३.१५ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार रेड बर्ड कॉलेजचे विद्यार्थी हे रात्री दारू पिऊन त्यांच्या टाटा हॅरियर एसयूव्ही (नोंदणी क्रमांक BR-03AM-9993) भरधाव वेगात गाडीने जात होते. दारू पिऊन ते फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडले होते. मात्र, त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर बाकीचे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.







