
फडणवीस म्हणाले, मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला मुख्य़मंत्री, उपमुख्यमंत्री पद ही तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे. अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष या महायुतीच्या वतीने आज आम्ही सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.किती लोकांचा शपथविधी होणार, याची माहिती सर्वांना सायंकाळपर्यंत दिली जाईल,उद्या सायंकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होईल, असं फडणवीस म्हणाले.





