
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबर या सलग तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण आले असून शाळांना सरसकट सुट्टी नसल्यांची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. प्रत्येक शाळांमधील मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याचा विचार करावा, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.