
मात्र, आता अर्जुनचं हेच धाडसी पाऊल त्याच्या आणि सायलीच्या नात्यासाठी घातक ठरणार आहे. अर्जुनने मैत्रीचं नाटक केल्याने आता प्रिया सतत त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिने अजूनही आश्रम केस संदर्भात अर्जुनला काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे तो देखील प्रियाशी प्रेमानेच वागत आहे. तिच्याशी हटकून वागलो तर, तिचा आपल्यावरचा विश्वास उडेल. म्हणून अर्जुनही प्रियाशी जपूनच वागत आहे. दुसरीकडे प्रियाला असं वाटत आहे की, अर्जुन आणि सायली यांचं नातं बिनसलं असून, आता अर्जुन तिला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करू शकतो, म्हणून प्रिया देखील अर्जुनला आपलंसं करण्याचे सगळे प्रयत्न करत आहे.








