
आदित्यने सांगितले सत्य
हर्षवर्धन आदित्यला मुक्ताच्या विरोधात काही तरी करायला सांगतो. म्हणजे स्वत:ला त्रास होईल असे. आदित्य उकळलेले पाणी स्वत:च्या हातावर ओतून घेतो. त्यानंतर तो पोलिसात तक्रार करतो. जेव्हा पोलीस मुक्ताला अटक करण्यासाठी येतात. तेव्हा सर्वांना धक्का बसतो. हे सगळं मुक्ताने केले असे तो म्हणतो. तेवढ्याच सई सागरला बोलावून आणते. सागर आदित्यला प्रश्न विचारतो हे नेमके कसे झाले मला सांग. त्यावर आदित्य थोडा घाबरतो. सागर आदित्यला सांगतो जर खरे सांगितले नाहीस तर तुला पोलिसात देईन. तेव्हा आदित्य म्हणतो की मुक्ताने केलेले नाही. पोलीस तेथून निघून जातात.








