
राज्यात आता विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. महाविकास आघाडीचे यश पाहून आता सर्व पक्ष तयारीला लागले आहे. त्यात विधान परीक्षेच्या जागेवरून मनसे आणि भाजपमध्ये तणाव सुरू झाला होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यानी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. दरम्यान, या निवडणुकीतही राज ठाकरे साथ देतील अशी अपेक्षा भाजप नेत्यांना होती. यामुळे भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत डावखरे यांना उमेदवारी जाहिर झाली होती. तर मनसेने देखील अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या. राज ठाकरे यांच्या उमेदवारायमुळे भाजपची कोंडी होणार होती. त्यामुळे मनसेने या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते.





