
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल असे कुणालाच वाटले नव्हते. कारण पक्ष नव्हे तर एक कुटूंब म्हणून शरद पवारांनी सर्वांना जपले होते. अनेकांच्या चुका, उणिवा सांभाळून घेतल्या होत्या. अनेक नेते शरद पवारांनी घडवले. मात्र पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करताच आमचा पक्ष फुटला. या फुटीला कोणताही तात्विक आधार नाही, पक्ष का फुटला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.





