
नातेवाईक असतांना देखील जबरदस्तीने अनोळखी मृतदेह म्हणून पोलिसांनी केले अकोल्यातच केले अंत्यसंस्कार
गोवर्धनचा मृत्यू झाल्यावर याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. त्याचे कुटूंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांना त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्याचा मृतदेह गावी नेण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना धमकावत आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून पोलिसांनी गोवर्धनवर अंत्यसंस्कार करत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.





