अर्जुन सायलीवर भडकला! फोनवरच भांडला; ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

0
16
अर्जुन सायलीवर भडकला! फोनवरच भांडला; ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?


अर्जुन सुभेदार हादरणार!

आता हा क्लॉज लक्षात आल्यानंतर आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अर्जुन म्हणतो की, हा क्लॉज मी स्वतः टाकला होता. मात्र, याच्यात मीच अडकलो आहे. त्यामुळे आता अर्जुनने आपलं प्रेम लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुटलं, तर सायली आपल्या आयुष्यातून निघून जाईल, याची धास्ती त्याला वाटत आहे. दुसरीकडे, आनंदात असलेली सायली अर्जुनला फोन करते, तेव्हा अर्जुन सायलीवर भडकतो. ‘मी ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये याचा अर्थ कामात आहे आणि तुमचा फोन उचलत नाही, तर तुम्ही सारखा का फोन करता’, असं जोरात बोलून तो फोन ठेवून देणार आहे. आता सायलीला अर्जुनच्या या वागण्या मागचं कारण कळेल का? त्यामुळे ही दुखावली जाईल का आणि दोघांमधील गैरसमज दूर होऊ शकतील का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.



Source link