
अभिराम लीलाला शोधू शकेल?
दुसरीकडे, भर साखरपुड्यातून लीला पळून गेल्याचे कळताच, अभिराम देखील चिडला आहे. मात्र, लीला पळून जाऊ शकत नाही आणि अशी जर ती पळून गेली असेल, तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, असं म्हणून आता अभिराम लीलाला शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. आता लीला अभिरामला सापडणार की नाही? अभिराम लीलापर्यंत पोहोचू शकेल की नाही? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.








