
चंद्रपुरात महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा!
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा जवळील माजरी येथे एका धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादातुंन १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती ही गंभीर आहे. विषबाधा झालेल्यामध्ये ६ पुरुष, ३० महिला व २४ लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ही घटना १४ एप्रिल रोजी घडली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील कालीमाता मंदिरात शनिवारी (दि १३) रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील धार्मिक कार्यक्रमात आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक माजरी येथे आले होते.





