आजारी पडले अन्…
आपल्या आजाराविषयी सांगताना ती म्हणाली की, ‘आशुतोषच्या निधनानंतरचा ट्रॅक होता, तेव्हा मी सलग तीन-चार दिवस दिवसातले तब्बल बारा तास रडत होते. म्हणजे सलग रडण्याचेच सीन्स सुरू होते. यामुळे माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं होतं. एक दिवशी सकाळी मी अलार्म बंद करायला उठले, तेव्हा मला चक्कर आली. त्यानंतर दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की, मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे सुरू झालं होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी तो पूर्ण आठवडाभर काम केलं. आता मी बरी झाले आहे. एखाद्या मालिकेचं काम करताना कलाकारांना भावनांचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाही. तुम्ही सतत भूमिकेत असता. अशावेळी कलाकारांनी छोटे-छोटे ब्रेक घ्यायला हवेत, असं मला वाटतं’.