
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आज (दि.११) झालेल्या २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सात गडी राखून विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीची संधी दिली. आरसीबीने मुंबईविरुद्ध २० षटकांत आठ गडी गमावून १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १५.३ षटकात ७ गडी राखून आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवला. आयपीएल सामन्यातील मुंबईचा हा दुसरा विजय आहे.






