
आनंद यांनी पक्षावर गंभीर आरोप करताना म्हटले की, पक्षात दलित आमदार, खासदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान मिळत नाही. दलितांना फसविण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात राहणे मुश्किल झाले आहे. यासाठी मी मंत्रीपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आनंद म्हणाले आम आदमी पक्ष भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला आहे. त्याबद्दल मी अधिक काही बोलू शकत नाही. कालपर्यंत मला वाटत होते की, आम्हाला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करत आहे, मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाटते की, काहीतरी गडबड आहे.






