
दुसरीकडे आपल्या वडिलांना लवकरात लवकर जामीन मिळावा म्हणून तुरुंगात पोहोचण्यासाठी अर्जुन सगळी घाई करत आहे. मात्र, अर्जुन तुरुंगात पोहोचण्याआधीच महिपत आणि साक्षी चैतन्य आणि रविराज यांना हाताशी घेऊन प्रताप सुभेदार यांना जामीन मिळवून देत, घरी घेऊन येणार आहेत. आता तुरुंगात पोहोचलेल्या अर्जुनला याबद्दल कळणार आहे. चिडलेला अर्जुन घरी येऊन पुन्हा महिपतला धमकावणार आहे. मालिकेत प्रेक्षकांना चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.







