फलटणः धोम – बलकवडी कालवा समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई येथे विधान भवनात आयोजित केलेल्या होती . यावेळी फलटण तालुक्याचे आमदार दिपक चव्हाण व खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील व आमदार बाळासाहेब पाटील व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
सध्या सुरु असलेल्या पाणी टंचाई परिस्थितीमध्ये फलटण व खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी धोम – बलकवडी धरणामधून फलटण व खंडाळा तालुक्यांना पिण्याचे पाणी सोडण्यात यावे , अशी आग्रही मागणी आमदार दिपक चव्हाण व मकरंद पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली होती . त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी धोम – बलकवडी धरणातून फलटण व खंडाळा तालुक्यासाठी पिण्याचे पाणी सोडण्याच्या निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले असल्याची माहिती आमदार दिपक चव्हाण यांनी दिली आहे
फलटण व खंडाळा तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बऱ्याच गावांमध्ये सद्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले आहेत . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा आठवड्यातून काही वेळा मिळत आहे . या सर्वावर उपाय योजना म्हणून धोम – बलकवडी धरणा मधून पिण्याचे पाणी सोडणे आवश्यक आहे . यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे दिपक चव्हाण व मकरंद पाटील यांनी आग्रही भूमिका मांडत , धोम बलकवडी धरणातून पाणी तातडीने सोडण्याची मागणी केली आहे . त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जलसंपदा विभागला पिण्याचे पाणी सोडण्याबाबत चे निर्देश दिले आहेत .