
न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले, “मिस्टर काऊन्सिल, तुम्ही स्वत: तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव एखाद्या हिंदू देव किंवा मुस्लिम पैगंबरांच्या नावावर ठेवाल का? मला वाटते, जर आपल्यापैकी कोणी अधिकारी असता, तर आमच्यापैकी कोणीही त्यांचे नाव अकबर आणि सीता ठेवले नसते. आपल्यापैकी कोणी एखाद्या प्राण्याला रवींद्रनाथ टागोर यांचे नाव देण्याचा विचार करू शकेल का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.