
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी प्रत्येक सभांमध्ये घोषणा करतात की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा. जनतेला वाटते की, यांनी बायकोला सोडून दिले आहे, मुलंही नाहीत. मग हा माणूस कोणासाठी कमावून ठेवणार? मोदींच्या पुढे-मागे कोणीच नसून हा कमावून करणार तर काय? त्यामुळे मी भ्रष्टाचार करणार नाही, या घोषणेवर जनतेचा विश्वास बसतो. वाटते की, हा माणूस खरं बोलत असावा.







