
‘फडणवीसांच्या वक्तव्यावर मला बोलावसंही वाटत नाही. त्यांच्यावर जर हे बेतलं असतं तर त्यांना कळलं असतं. हा गृहमंत्री लोकांचं संरक्षण करण्यात पुरता अपयशी ठरलाय. देवेंद्र फडणवीसांना मी फडतूस, कलंक बोललो होतो. पण आता शब्दही राहिलेले नाहीत. फडतूस, कलंक हे शब्द सौम्य वाटावेत असं वक्तव्य त्यांनी अभिषेकच्या हत्येबद्दल केलं आहे. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे. राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.





