IND vs SA U19 : टॉस जिंकत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय | पुढारी

0
17
IND vs SA U19 : टॉस जिंकत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : आज अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. या संपूर्ण स्पर्धेत हा संघ अपराजित असून मागील सलग पाच सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सामन्यात टॉस जिंकत भारतीय संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (IND vs SA U19)

नमन तिवारीला संधी

भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नमन तिवारीचे संघात पुनरागमन झाले आहे. (IND vs SA U19)

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका : युआन जेम्स (कर्णधार), क्वेना माफाका, दिवान माराईस, नकोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, लुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), रिचर्ड सेलेट्सवेन, स्टीव्ह स्टोक्स, डेव्हिड टेगर, ऑलिव्हर व्हाइटहेड, ट्रिस्टन लुस.

भारत : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

हेही वाचा :





Source link