
सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोट्या हनिमूनसाठी रवाना झाले आहेत. कल्पना सुभेदार यांच्या हट्टामुळे सायली आणि अर्जुन यांना नाईलाजस्तव हनिमूनला जावंच लागलं आहे. मात्र, या प्रवासात देखील त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. अर्जुन आणि सायलीने ही ट्रीप अर्ध्यावर सोडू नये म्हणून, त्यांच्यासोबत चैतन्य पाठवण्यात आलं होतं. तर, आता चैतन्य देखील त्यांना सोडून परतला आहे. माथेरानच्या गुलाबी थंडीत ते आपल्या आयुष्यातील खास रोमँटिक क्षण अनुभवणार आहेत.







