
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (२३ जानेवारी) ही घोषणा केली.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी (24 जानेवारी) कर्पूरी ठाकूर यांची 100 वी जयंती असताना सरकारने ही घोषणा केली आहे.
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंगळवारी (२२ जानेवारी) जेडीयू नेते केसी त्यागी यांनी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली होती.










