
६७ दिवसांत १५ राज्यांतून करणार प्रवास
लोकसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात येणारी ही यात्रा ६७ दिवसांत १५ राज्ये आणि ११० जिल्ह्यांतून जाणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. या काळात ही यात्रा सुमारे १०० लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अंदाजे ६,७०० किलोमीटरचे अंतर कापले जाईल. हा प्रवास बहुतांशी बसने केला जाणार आहे, पण काही ठिकाणी चालतही प्रवास असणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाईल.







