
ही गोष्ट २०२१ ची आहे, जेव्हा राम मंदिर निर्माणासाठी देशभरातून वर्गणी गोळा केली जात होती. विश्व हिंदू परिषदेचे नेते व कार्यकर्ते छत्तीसगड राज्यातील गारियाबंद येथील लोकांकडे वर्गणी मागायला गेले होते. त्यावेळी बिदुलाची नजर त्यांच्यावर पडली. या वृद्ध महिलेला समजले की, राममंदिरासाठी वर्गणी गोळा केली जात आहे. तिने त्या दिवशी कमाई झालेल्या ४० रुपयांपैकी २० रुपये मंदिरासाठी दान दिले होते.








