
‘आई कुठे काय करते’ मालिकेत आपण काही दिवसांपूर्वी पाहिले की मनूच्या येण्याने आशुतोष आणि अरुंधतीचे आयुष्य बदलले आहे. त्यांनी मनूला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते मनूसाठी चांगली शाळा शोधत आहेत. अशातच कोणी तरी मनूशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आशुतोषला चिंता सतावत आहे. तो सतत मनू विषयी काळजी व्यक्त करत आहे. अशातच मनूच्या शाळेतील एका शिक्षिकेवरुन आशुतोषला भीती वाटू लागते.







