
एकनाथ शिंदे म्हणाले की,आम्ही दिल्लीत गेलो की म्हणतात, यांचा स्वाभिमान हरवला आहे, दिल्लीचेकटपुतली आहेत. ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही खाजवता येत नाही,त्यांनी आमच्यावर आरोप आणि स्वाभिमानाची भाषा करु नये. आम्ही दिल्लीत जातो, निधी आणतो. असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.मागील अडीच वर्षात अहंकारामुळेच राज्याचं नुकसान झालं. अनेक प्रकल्प बंद पाडले. आमचं सरकार आल्यानंतर मेट्रो, आरे,समृद्धी सगळे प्रकल्प मार्गी लागले.





