
मधुभाऊ उजव्या हाताने बंदूक उचलून गोळी झाडूच शकत नाहीत. त्यांच्या उजव्या हातात तितकी शक्तीच नाही, असे सायली अर्जुनला सांगणार आहे. मधुभाऊ हे डावरे असून, त्यांची रोजची कामं देखील डाव्या हातानेच करतात, हे ऐकून आता प्रियाचा जबाब खोटा असल्याचे त्यांच्यासमोर येणार आहे. याचाच अर्थ विलासच्या खुनाच्यावेळी केवळ मधुभाऊ नाही तर, त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती उभी होती. याच व्यक्ती मधुभाऊंचा खून केला आहे, असा निष्कर्ष अर्जुनने लावला आहे. तर, ही व्यक्ती साक्षीचा होती, हे देखील अर्जुनच्या लक्षात येणार आहे.







