
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी स्वाभिमान लिलावात काढला नसता तर राज्यातून उद्योग पळवता आले नसते. मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योगांचंही ‘हार्दिक’ स्वागत करता आलं असतं. सैन्याला पुरेपूर रसद पुरवली आणि चिवटपणे बाजू लावून धरली तर गमावलेल्या गोष्टी पुन्हा कमावता येतात,त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी. असो!, असं म्हणत मनसेने सरकारवर निशाणा साधला आहे.




