
मध्य रेल्वेवर अतिक्रमणची समस्या सर्वाधिक हार्बर रेल्वे मार्गावर आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वडाळा, मानखुर्द, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर येथे अधिक अतिक्रमण झालं आहे. येथे रेल्वे ट्रॅकच्या जवळच अवैध बांधकाम करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवताना अनेक वेळी राजकीय विरोधाचा सामना करावा लागतो. रेल्वे रूळांशेजारी राहणारे लोक रुळालगतच कचरा फेकतात, घरातील सांडपाणी ट्रॅकवर साचते. या सगळ्यांमुळं रुळांचे नुकसान होते आणि म्हणूनच लोकलचा वेग मंदावतो.




