
सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात ४० टक्के समाज शेतीवर आहे. तर, ८० कोटी लोक ऐत खात आहेत. यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करण्यात यावी, ज्यामुळे आपला देश बलशाली होईल, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. इतकी माणसे आयत खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. देशातील लोकांना भिकारी बनवण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडले आहे.






