
निशीला बालपणापासूनच बॅडमिंटनपटू व्हायचे होते, हे स्वप्न तिने नेहमीच आपल्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवले होते. या आधी जेव्हा तिने आपल्या खेळाची चुणूक दाखवलेली तेव्हा रघुनाथराव खोत खूप चिडले होते. त्यांनी निशीला अतिशय कठोर शिक्षा दिली होती. हाच प्रसंग आता उमाला राहून राहून आठवत आहे. पुन्हा जर रघुनाथ खोत यांना निशीच्या खेळाबद्दल कळले तर, ते पुन्हा अशीच काहीतरी शिक्षा करतील, याची भीती उमाला वाटत आहे. निशी आणि ओवी कुठे गेल्या आहेत, याबद्दल उमाला चांगलीच कल्पना आहे. आपल्या मुलींच्या स्वप्नांना पाठिंबा द्यावा असे उमाला मनापासून वाटत आहे. मात्र, या आधी तिने कधीही रघुनाथ खोतांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, आता तिने हे पाऊल उचलले आहे.







