
अदानींच्या घोटाळ्याचा आकडा आता ३२ हजार कोटी झालाय!
लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली आहे. ही बातमी एखादं सरकार पाडू शकते. कारण जो माणूस ही चोरी करतोय, त्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा-पुन्हा वाचवत आहेत. देशातील एकही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी या बातम्या दाखवत नाहीत, याबद्दल राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. यापूर्वी आम्ही २० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता त्यात १२ हजार कोटींची भर पडली आहे. त्यामुळं ही रक्कम आता ३२ हजार कोटी रुपये झाली आहे.








