
‘कोणत्याही परिस्थितीत पुढील निवडणुकांच्या आधी हा निर्णय व्हायला पाहिजे. ही संपूर्ण प्रक्रियाच व्यर्थ ठरू नये याची काळजी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायला हवी. त्यांनी या गोष्टी इतक्या सहज घेऊ नयेत, असं खंडपीठ म्हणालं. इतकंच नव्हे, विधानसभा अध्यक्षांनी वेळेवर निर्णय घेऊ नये असं तुमच्या पक्षाला का वाटतं. त्यांना निर्णयाची इतकी भीती का वाटते,’ असा थेट प्रश्न सरन्यायाधीशांनी मुकुल रोहतगी यांना केला.






