
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून कंगना आपल्या दमदार अभिनयाने मोठा पडदा गाजवत आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडते. काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील नाती, मैत्री ही फेक असते असे म्हटले होते. आता यावर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.






