
रमाच्या या चुकीमुळे आनंदीच्या पोटी तिचा जन्म टळला. तर, रमाशिवाय इतर कुणीच नाही, असं भाग्य असल्याने आता आनंदीला ती आई होऊ शकत नसल्याची वाईट बातमी मिळाली आहे. अर्थातच रमाच्या या चुकीची शिक्षा आता आनंदीला भोगावी लागत आहे. हे कळल्यानंतर आता रमाला देखील वाईट वाटत आहे. त्यामुळे ती चित्रगुप्ताशी भांडून आनंदीसोबत सुरू असलेला हा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. आनंदी आणि रमा एकमेकींच्या सवती आहेत. पण, काळाबरोबर त्या मैत्रिणी झाल्या. नेहमी एकमेकींसाठी उभ्या राहिलेल्या आणि एकमेकींचा अस्तित्व जपलेल्या या दोघी पुन्हा एकत्र येणार आहे. आनंदीच्या सुखी संसारासाठी निघून गेलेली रमा पुन्हा परतणार आहे. पण, आता एका दुसऱ्या जगात असणाऱ्या रमाला साक्षात चित्रगुप्त भूतलावर परत येण्याची संधी देईल का?, हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.






