
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ आणि सुजाता यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबियांचा याला विरोध असल्याने दोघे कसारा येथे राहणाऱ्यासाठी आले. भाड्याने खोली घेत दोघांनी कसाऱ्यात राहण्याचा निर्णय घेतला. भाड्याने खोली घेण्यासाठी सोमनाथला मोठा संघर्ष करावा लागला. बॅगा आणि अन्य सामान मित्राच्या घरी ठेवून जोडपं सोबत राहत होतं. सोमनाथ गवंडी काम करत उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे गोळा करत होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून खोली बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. परंतु आतून आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती घरमालकाला दिली.




