
सायली ही एका अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. मात्र, तिच्या याच आश्रमावर बिल्डरचा डोळा असतो. यातूनच या आश्रमात एक खून होतो. मात्र, या सगळ्या खुनाचा आरोप इथल्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या मधु भाऊंवर लावला जातो. यानंतर पोलीस मधु भाऊंना पकडून घेऊन जातात. तर, आता मधु भाऊंना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सायलीने अर्जुनची मदत मागितली होती. तर, अर्जुनने मधु भाऊंना यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक अट ठेवली. या अटीनुसार सायलीला अर्जुनशी लग्न करावे लागणार होते. मधु भाऊंना सोडवण्यासाठी सायलीने लग्न गाठ देखील बांधली.








