
मालिकेत खलनायिका साकारात असल्याने विदिशा म्हणाली की, आयेशाकडून शिकावं किंवा तिच्याकडून एखादा गुण घ्यावा असं काहीच नाही. पण, जर मी आयेशाकडून काही गुण घेतले तर माझ्या आयुष्यातील सगळी माणसंच उद्ध्वस्त होतील. पण, आयेशाकडून घ्यावा असा एक गुण आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं हा गुण मी आयेशाकडून नक्की घेईन. कारण, आयेशा कार्तिकवर जितकं प्रेम करते, तेव्हढं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कुणावरही केलेले नाही. त्यामुळे मी तिच्यासारखं प्रेम करायला नक्की शिकेन.’







