
नेमकं प्रकरण काय आहे?
बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी राम कुमार यांच्या मदतीने एक चित्रपटगृहाचा व्यवसाय केला होता. परंतु त्यात सातत्याने तोटा होत असल्याने अचानक चित्रपटगृह बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ईएसआय रक्कम कापण्यात आली होती. त्यामुळं नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी जय प्रदा यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. याशिवाय श्रम विमा कंपनीनेही जया प्रदा यांच्यासह दोघांवर कोर्टात खटला दाखल केला होता. त्यानंतर जया प्रदा यांच्याकडून कोर्टात कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन दिलं जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांनी कर्मचाऱ्यांना पैसे दिले नाही, त्यानंतर कोर्टाने त्यांना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.








