
सध्या देशमुख कुटुंबीयांसोबत बरेच काही घडत असते. त्यामुळे कांचन पूजेचे आयोजन करतात. त्यासाठी त्या ईशाला देखील घरी घेऊन येतात. अशातच सर्वजण ईशा आणि अनिशचे पुन्हा लग्न लावणार असल्याचे सांगतात. मात्र, ईशाला तिचे लग्न हे ग्रँड करायचे असते. तिची ही मागणी ऐकून सर्वजण संताप व्यक्त करतात. अरुंधती ईशाला लग्नाचे महत्त्व पटवून देण्याा प्रयत्न करते.अरुंधती ईशाला सुनावते की, ‘एवढं सगळं होऊनही तुझ्या आजीला तुम्हाला आशीर्वाद देता आले नाही याची रुखरुख आहे, म्हणून हे लग्न होतंय. अनिशने त्याच्या आईवडिलांचा राग सहन करुन त्यांना समजावलं म्हणून हे लग्न होतंय. तुमच्या काळजीपोटी मी काही पावलं मागे आले म्हणून लग्न होतंय.’







