
जळगाव दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेवरून भाजपवर टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, ही भयंकर दुर्घटना आहे. त्यातून बचावलेल्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. हे खूप दुर्दैवी असून प्रशासनाचं व सरकारचं याकडं दुर्लक्ष झालं आहे. राज ठाकरे यांनी आधीच इशारा दिला होता की, अशा घटना घडू शकतात. मात्र त्यावर सरकारकडून काहीही पावले उचलण्यात आलेली नाही. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर याकडं लक्ष देता आलं असतं, अशी टीका अमित ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.





