
सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे. अभिनेत्याने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्याच्या बोलण्याचा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. आपण नेहमीच शेतकऱ्यांना साथ देत आलो आहोत आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करण्याची कल्पनाही करू शकत नाही. सुनील शेट्टी म्हणाला की, त्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काम केले असून, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ मिळेल, अशी त्याची इच्छा आहे.






