
विनायत राऊत म्हणाले की, राज्यात गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी होतेय. अजित पवार व समर्थक आमदारांनी सरकामध्ये एंट्री केल्याने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. त्यांचा समजूत घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीत पंचाईत झाली आहे. अजित पवारांच्या सरकारमध्ये सामील होण्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी आम्ही ज्या घरात होतो तेच बरं आहे. आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीने साद घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, अशी वक्तव्ये केली आहेत.पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोक म्हणताहेत,जे होतं तेच बरं आहे,पुनश्च एकदा मातोश्रीची क्षमा मागावी असं वाटतंय, अशी चर्चा चालू असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.







