
विद्युतशी घटस्फोट घेतल्यानंतर आता शिल्पी विक्रमशी लग्न करण्यासाठी धडपड करत आहे. विक्रमसोबत लग्न करण्यास परवानगी मिळावी म्हणून शिल्पी आई-बाबांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ती खास स्वयंपाकाचा बेत करते. आई-वडिलांशी ओळख करून देण्यासाठी विक्रमला जेवायला बोलवते. मात्र, आई-बाबा दोघेही जेवणावरून उठून जातात. यामुळे शिल्पी त्यांच्यावर प्रचंड संतापते. शिल्पीचं हे रूप पाहून आता विक्रम देखील पुरता गोंधळून गेला आहे. बाबा चिडले आहेत, हे लक्षात आल्यावर तो त्यांची समजूत काढयला जातो.







